सा हि त्या क्ष र

2020, एप्रिल

हिरव्या हातांचा माणूस : गोविंद के. पाटील

 हिरव्या हातांचा माणूस  अर्थात काका कुलकर्णी  आजची सकाळ ही नको असलेली अस्वस्थ बातमी घेऊन उगवलीय… माझ्या शेतघराच्या अवतीभवतीची नारळीची झाडं ज्यांनी भेट म्हणून पाठवली होती तो महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार विजेता हिरव्या हाताचा माणूस-गुंडोपंत तथा काका कुलकर्णी यांचा पुण्यात अटॅकने मृत्यू झाल्याची भयंकर बातमी कळली आणि डोक्यात आळवणींचं काहूर माजलंयकाळम्मावाडी डावा कालवा येण्याआधीचं नाधवडं गाव…ओढ्यालगतच्या […]

2020, एप्रिल

डागी (डागाळलेले) पुरस्कार : विठ्ठल सोनवणे

 डागी (डागाळलेले) पुरस्कार : विठ्ठल सोनवणे (या लेखात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)   .पुरस्कार, सन्मान, किंवा बक्षीस हे शब्द आनंद वाढवतात. मनाला सुखावतात. ज्या कोणा अबालव्रूद्धाला असा पुरस्कार मिळतो. त्याच्या तपसाधनेचे चीज होते. श्रमाचे फलित मिळते. सर्वात महत्त्वाचे आणखी पुढे काम करण्यास बळ येते. मात्र याबाबत खेदाने काही गोष्टी लिहाव्या वाटतात.आज साहित्य. जगतात पुरस्काराची रेलचेल

2020, एप्रिल

पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता : डॉ.जगदीश कदम

(ब्लॉगवरील लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच,असे नाही-संपादक,साहित्याक्षर )   पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता: डॉ.जगदीश कदम     सुनील यावलीकर हे चित्रकार म्हणून  विख्यात आहेत.माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अवतीभोवती जगण्याचा पसारा मांडणा-या रेषाकृती ही त्यांच्या रेखाचित्रांची खाशियत राहिलेली आहे, असे त्यांच्या चित्रांविषयीचे आमचे निरीक्षण आहे.या मुळात चित्रकार असलेल्या कवीची कविता सुध्दा हाच आशय गाभा अग्रस्थानी ठेवणारी आहे.माणूस आणि त्याच्या इतस्ततः

2020, एप्रिल

पुस्तकांच्या कविता : जनार्दन देवरे

(आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त या पुस्तकांच्या वेगळ्या,नव्या कविता ) जागतिक पुस्तक दिन वगैरे……… (उत्तरार्ध)       -१-  पुस्तके खुणावताहेत…  मला,तुम्हाला,सर्वांना- आपले जगण्याच्या बेडीत अडकलेले पाय मात्र वळत नाहीत तिकडे…. पुष्कळदा खिशास घालूनही साकडे… पुस्तकांपर्यत पोहचतच नाही व्यवहारी मन तोकडे..!       -२-  काचेच्या कपाटात सजलेली, वाचनालयांपर्यंत पोहचलेली पुस्तके वाट पाहताहेत जिवंत स्पर्शाची … कोणीतरी

2020, एप्रिल

शरद पाटलांची क्रांतिकारक कमिटमेंट : राजकुमार घोगरे

 शरद पाटलांची क्रांतिकारक कमिटमेंट    शपांचा चौथा खंड Primitive Communism, Matriarchy-Gynocracy and Modern Socialism ने भारतीय अॅकेडमिशियन्सवर ज्याप्रमाणात प्रभाव टाकला त्यापेक्षा अधिक प्रभाव आंतरराष्ट्रीय बुद्धिजीवीवर टाकला. त्या ग्रंथाच्या प्रचारात मोठा वाटा ‘वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीज’चा होता. त्यांनी त्यावरील अभ्यासासह त्याचा समावेश स्वित्झर्लंडच्या त्यांच्या मॅट्रिआर्काइव्हमध्ये करण्याची इच्छा व्यक्त करणे महत्वपूर्ण ठरले.  वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीजच्या जगभर पसरलेल्या नेटवर्कमध्ये तो ग्रंथ चर्चेचा

2020, एप्रिल

विषाणूपुढे हतबल मानवाला उमेद देणारी कविता : प्रा. जयसिंग गाडेकर

( परिचय : प्रा.सौ. मीनल सुरेश येवले, एम. ए.मराठी,राज्यशास्र,समाजशास्त्र बी.एड.एम.फिल. पद –  कनिष्ठ व्याख्याता ग्रामविकास कनिष्ठ महा.कुही             जि. नागपूर *प्रकाशित पुस्तके* * मोहोर    – कवितासंग्रह – 2007 * परिघ    – कवितासंग्रह – 2013 * आंदण   – ललितलेख संग्रह – 2017 * एकांताचे कंगोरे  – ललितलेख संग्रह – 2019

2020, एप्रिल

हिंदू मुस्लिम यांच्या वेदनेचा प्रवास : इंधन

  साधारणतः पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेली हमीद दलवाई यांची ‘इंधन’ ही कादंबरी स्वातंत्र्यानंतरही जिवंत असलेल्या जातीयतेच्या म्हणजे हिंदू-मुस्लिम ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेदना, येणारी अस्वस्थता आणि माणसा-माणसांचा तुटत जाणारा संबंध, निर्माण होणारी संशयीवृत्ती या सर्व गोष्टी परखडपणे मांडते.        वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदू-मुस्लिम लढ्यावर भाष्य करणारी मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी म्हणून ‘इंधन’कडे पाहिले जाते. 

2020, एप्रिल

अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण- प्रभाकर साळेगावकर

।।अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण।। शाहिरी कवितेच्या अविष्काराची मुळं यादवकालाच्या पुर्वीपासुन राजस्थानातुन आलेल्या भाटगिरीत रूतलेली आहेत.पारंपारिक शाहिरी कवितेला ब-या पैकी राजाश्रय आणि लोकाश्रय ही मिळाला हे लक्षात येते.अगदीच थोडक्यात  सांगायचे मःहणजे१७ व्या शतकाच्या उतरार्धापासुन पारंपरिक वाडःमयाच्या निर्मितीची सुरूवात आहे.यातील संत साहित्याने अध्यात्माचा विचार केला तथापि शाहिरांनी करमणूक विभाग संभाळताना पराक्रम ,प्रेम ,विरह याचे दर्जेदार

2020, एप्रिल

पंढरी :खानोलकरी प्रतिभेचा अंगावर येणारा अनुभव

चिं. त्र्यं.खानोलकर   पंढरी :खानोलकरी प्रतिभेचा अंगावर येणारा अनुभव  इसवी सन १९६० नंतर कथाकार म्हणून उदयास आलेल्या आरती प्रभू उर्फ चिं .त्र्यं .खानोलकर यांचे सनई (१९६४ ),राखी पाखरू(१९७१) आणि  बाप (१९७८)  हे तीन कथासंग्रह आणि गणूराया चानी आणि चाफा व  देवाची आई इत्यादी दीर्घकथांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत .      १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या’ राखी पाखरू’ या कथासंग्रहातील ‘पंढरी’ ही कथा वाचकांच्या मनाला स्पर्शून

2020, एप्रिल

मनोहर तल्हार यांची जुनी मुलाखत

( प्रमोद मुनघाटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.) “लोक म्हणतात, ‘माणूस’ नंतर तल्हार संपले…जुनी मुलाखत१९९५  □■“लोक म्हणतात, ‘माणूस’ नंतर तल्हार संपले, पण लेखक कधीच संपत नसतो. पाच-दहा वर्षांनंतर तो ज्वालामुखीसारखा स्फोट घेत असतो. पण दरम्यान त्याची ज्वालामुखी निद्रिस्त असते एवढेच. आणि त्याला कारणेही असतात. तुम्ही विचारता की, जीवनात कोणती गोष्ट राहून गेल्याची रूखरूख आहे. मी माणूस

2020, एप्रिल

समतेचे प्रवर्तक- महात्मा बसवेश्वर : विश्वास सुतार

समतेचे प्रवर्तक- महात्मा बसवेश्वर आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने  सारे जग आपल्या हाताशीच नव्हे तर अगदी जणू मुठीतच आले आहे. प्रांत आणि देशांच्या सीमा धूसर होत आहेत. जागतिकीकरणाने जग एक खेडेच होत आहे. दळणवळण आणि संपर्क माध्यमांच्यामुळे अनेक गोष्टी सहज सुलभ होत आहेत. ज्ञान आणि उद्योग- व्यवसायाच्या संधी विविध पर्यायांनी आज

2020, एप्रिल

सुधीर देवरे यांना एक अनावृत्त पत्र -राकेश वानखेडे

मा. सुधीर देवरे सर,              नमस्कार,                आपली गोष्टीत मावत नाही ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली .अत्यंत पारदर्शी असं निवेदन हे या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. कोणताही आडपडदा न ठेवता ती सहजपणे चित्ररूपी होते. खूप दिवसांपूर्वी मी  फ्योदर दस्तोवस्की यांची भूमिगत ( नोट्स फ्रॉम  अंडरग्राउंड )नावाची एक लघु कादंबरी वाचली होती. त्यातला वास्तवदर्शी आणि स्वयम् अंर्तचित्रणाचा अत्यंत विलक्षण असा तटस्थ प्रयोग एकोणिसाव्या शतकात रशियन साहित्यविश्वात

2020, मे

बुद्धपूर्व इतिहास, भारताचा : वा.वि. मिराशी

बुद्धपूर्व इतिहास, भारताचा :___________________________________________ – मिराशी, वा. वि. भारताचा अगदी आरंभापासून ते गौतम बुद्धाच्या जन्मापर्यंतचा (इ. स. पू. सु. ६२३) इतिहासयेथे विवक्षित आहे. या काळाच्या इतिहासाचे मुख्य साधन पुराणांत नमूद केलेल्या परंपरा हे आहे. या परंपरा सूतांनी मुखोद्‌गत करून राखल्या होत्या. वैदिक काळातही इतिहासपुराण हा अध्ययनाचा विषय होता. हे उपनिषदातील (छांदोग्य उपनिषद् अ ७—खं. १)

2020, मे

आई समजून घेताना दोन पिढ्यांची होरपळ- डॉ.सुधाकर शेलार

उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग ठरावा असे आहे. यापूर्वीही असाच एक वेगळा प्रयोग डॉ.नरेंद्र जाधव यांनी ‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाच्या रूपाने केलेला होता. हे दोन्हीही प्रयोग दलित साहित्याशी निगडित अशा स्वरूपाचे आहेत, हे विशेष. या दोन पुस्तकांमुळे दलित आत्मकथनांमध्ये निर्माण झालेले आवर्त वर्तुळाबाहेर जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत असे म्हणता

2020, मे

सोशल मिडिया आणि ‘ती’ – संदीप नाझरे

‘बघ ना, तुझ्यासाठी गजरा आणलाय !’“अय्या खरंच?” म्हणत ती मोबाईल टेबलवर ठेवून गजरा केसात माळायला कपाटाच्या आरशासमोर जाते. इतक्यात तिच्या मोबाईलवर मेसेंजरची टिकटिक सुरू होते. शर्टाची बटने काढता काढता नवरा तिचा मोबाईल घेऊन मेसेंजर उघडतो.‘हाय’,  ‘डिअर’, ‘बोल ना’, ‘ऑनलाइन तर दिसतेयस्’ ‘फिलींग अलोन डिअर’ ‘आपण भेटूया का?’ ‘तुला कधी वेळ असतो?’हे अनोळखी व्यक्तीचे मेसेज बघून

Scroll to Top