सा हि त्या क्ष र

2020

2020, मे

छत्रपती संभाजी राजांचे स्वैरवर्तन (?) : डॉ. अशोक राणा

छत्रपती संभाजी राजांचे स्वैरवर्तन (?)___________________________________________ डॉ.अशोक राणा,यवतमाळ. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात सर्वात बदनाम व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर कुणाच्याही तोंडून एकच नाव येईल व ते म्हणजे संभाजी राजांचे. त्यांच्या या बदनामीमागे कारणे दिली जातात, ती त्यांच्या तथाकथित उच्छृंखल वृत्तीची. तसेच, चर्चा चवीने चघळली जाते, ती त्यांच्या तथाकथित स्वैरवर्तनाची. पण खरोखरच ते उच्छृंखल वा स्वैरवर्तनी […]

2020, मे

जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : : डॉ.प्रतिभा जाधव

जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : ‘काळ्या आईची तहान———————–  (काव्यसंग्रह- “काळ्या आईची तहान” द्वारा- गाव प्रकाशन,औरंगाबाद)*कवी – राजेंद्र दिघे ,मालेगाव)      अवघ्या जगाला संजीवनी देणारा बळीराजा स्वतःच बळी ठरत असलेला हा आजचा कडू काळ. ह्या कडू काळात जगाच्या पोशिंद्याची व्यथा-वेदना, अस्वस्थता कवी राजेंद्र दिघे यांनी काव्यसंग्रहात जोरकसपणे मांडली आहे. जगासमोर शेतकऱ्याच्या यातना, ससेहोलपट अगदी प्रामाणिकपणे

2020, मे

मतकरींची ‘लोककथा’ आमच्या परिसरातली.. : डॉ. जगदीश कदम

मतकरींची‘लोककथा’आमच्या परिसरातली.. मराठीतील एक प्रयोगशील नाटककार रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले.आम्ही एकदम भूतकाळात गेलो.मतकरींचं ‘लोककथा ७८’ हे नाटक गाजत होतं,तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो.अभ्यासक्रमाला नुकतंच हे नाटक लागलं होतं.आम्हाला ‘मराठी वाड़मयाचा इतिहास’हा विषय शिकवणारे नरहर कुरुंदकर गुरुजी यांनी रंगभूमीच्या संदर्भातील विवेचक प्रास्ताविक केलं आणि ‘लोककथा ७८’या नाटकाच्या अध्यापनाची जबाबदारी दत्ता भगत

2020, मे

स्त्रीदास्य : काल आणि आज – छाया बेले

    भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध असा वारसा म्हणजेच, न्याय, समता व शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावं, आणि ते हजारो वर्षे टिकून राहाव ही अतिशय खेदाची बाब आहे. शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणं हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात म्हणावी लागेल. आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या

2020, मे

वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी : डॉ.संजय बोरुडे

प्रतिभासंगम साहित्य व संस्कृती मंच च्या वतीने मी अनेक कविसंमेलनाचे आयोजन करायचो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला शेवगावचे ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे आवर्जून  उपस्थित रहायचे.. या कार्यक्रमातूनच संदीप काळे ( पाथर्डी ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी) यांसारखे नवे कवी पुढे आले. साम टीव्हीचे निवेदक दुर्गेश सोनार (पंढरपूर) यांना उमेदीच्या काळात आमच्या मंचाने खूपदा बोलावले. ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) तेव्हा विद्यार्थीदशेत

2020, मे

पुरातत्व विद्या

पुरातत्त्वविद्या : इतिहास (History of Archaeology) • प्रमोद जोगळेकर • प्रागैतिहासिक काळ भूतकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल ही खास मानवाची वैशिष्ट्ये आहेत. मानवी संस्कृतीला किमान पंचवीस ते तीस लक्ष वर्षांचा इतिहास आहे. इतक्या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही;

2020, मे

गीतकार योगेश यांची एक्झिट

गीतकार योगेश यांच्या  निधनाची वार्ता घेऊन आजची सकाळ उगवली आणि तीव्रतने जाणवलं की , अरे, हा तर 70च्या दशकातला जेंव्हा माझी मध्यवर्गीय  पिढी किशोर- तारुण्यभानाच्या उंबरठ्यावर होती, तेंव्हाच्या आमच्या अबोध भावभावनांना ज्यानी उजागर केलं आणि मंत्रमुग्ध केलं ते   हेच योगेश तर होते.          माझ्या मनाचा योगेशने कब्जा घेतला तो “रजनीगंधा फुल तुम्हारे युंही महके

2020, जुन

रात्र, दुःख आणि कविता : प्रा.मीनल येवले

पोळत्या जीवनानुभवांची अनुभूती– वणवा           पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात सहभागी कवींना पुष्पगुच्छासह एकेक पुस्तक देण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतरच्या भेटीगाठीत एका मैत्रिणीच्या हाती “ रात्र, दुःख आणि कविता ” हा संग्रह दिसला. कवयित्रीचं नाव वाचून अस्वस्थ झाले कारण तो मला हवा होता ना ! मी तशी मैत्रिणीकडे इच्छा व्यक्त केली नि

2020, जुन

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा…

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा…  प्रा. प्रल्हाद जी. लुलेकर [प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक दत्ता भगत यांनी आज (१३ जून) वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीबद्दल… ] भारतीय इहवादी विचार परंपरेचे म्हणजे बुद्ध-फुले-आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानातून महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारधारा प्रवाहित झाली. याच विचारांतून सत्यशोधकी, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य चळवळी, प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर समता, बंधुता,

2020, जुन

मी कुणी ‘वेगळी ‘ नाही ! : सोनाझरिया मिंझ

या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ‘ कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ‘ च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ‘ ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध*  एक आदिवासी महिला ही

2020, जुन

पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष

   आशिया खंडातील दोन नंबरचा विशाल वटवृक्ष    ‘ नेर ‘ या शब्दाचा अर्थ होतो ‘गांव ‘. अहमदनगर जिल्हयातील ‘संगमनेर ‘ या तालुक्याच्या गावाच्या नावाचा अर्थ होतो – संगमावरील गाव. हे तालुक्या चे गाव प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.   या तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट

2020, जुन

चौक आणि चौकट

लालसर रंगाच्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा गरुड, त्याखाली एक चौरस त्यात हिरवा, लाल, जांभळा अशा रंगांच्या छटा, फटकारे… काहीसं अब्स्ट्रॅक्ट .. पांढऱ्या व काळ्या अक्षरात पुस्तकाचं शीर्षक.. ‘ चौक आणि चौकट ‘. प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि त्यांचाच ब्लर्ब.. आणि कवी म्हणजे चक्क जाहिरात क्षेत्रातले मोठे नाव,कमर्शियल आर्टिस्ट अनंत खासबारदार…!ज्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो बनवला,

2020, जुन

शिवनेरीवरील बौद्ध लेणी

छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा. पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या

2020, जुलै

पल्ली : एक आकलन

*बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’* ‘Palli’ word related to Buddhism.  ‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते. नऊशे वर्षापूर्वी दक्षिण

Scroll to Top